पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कडक कारवाई

भारत सरकारने बुधवारी पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून घेतले. आणि त्यांना औपचारिक ‘पर्सोना नॉन ग्राटा’ नोट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची आपत्कालीन बैठक होऊन ती सुमारे दोन तास चालली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर तसेच वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ही कठोर कारवाई केली आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.

दहशतवादी हल्ल्याला गांभीर्याने घेत या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. प्रसारमाध्यमांना माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, सीसीएसने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच, भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील आपल्या लष्करी सल्लागारांनाही परत बोलावणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *