पाकिस्तान शिमला करारातून माघार घेणार

जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला प्रभावीपणे आळा घालत नाही, तोपर्यंत भारताने जल करार चालू ठेवणार नसल्याचे म्हटले आहे. भारताच्या या हालचालीला प्रत्युत्तर देण्याची योजना पाकिस्तान आखत आहे. भारताने सिंधू पाणी करार थांबविल्यानंतर, पाकिस्तान १९७२ च्या ऐतिहासिक शिमला करारातून माघार घेण्याची तयारी करत आहे.
सिंधू पाणी करार थांबविण्याच्या निर्णयामुळे पाकिस्तानचा नाश निश्चित मानला जात आहे. कारण, या करारानुसार पाकिस्तानला भारताकडून पाणी मिळते.
वृत्तानुसार,  भारत आणि पाकिस्तानने २ जुलै, १९७२ रोजी शिमला करारावर स्वाक्षरी केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या दारुण पराभवानंतर हा करार झाला. या कराराने दोन्ही देशांमधील वादांच्या शांततापूर्ण निराकरणाचा पाया रचला. करारातील सर्वात महत्त्वाच्या तत्वांपैकी एक म्हणजे दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रणरेषा ओलांडल्याशिवाय त्यांचे वाद शांततेने सोडवण्याची वचनबद्धता हे एक आहे.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *