
भारत सरकार पाकिस्तानभोवती सतत कडेकोट करत आहे. भारताने पाकिस्तानवरील कारवाई तीव्र केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक झाली.पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंटने स्वीकारली आहे. ही संघटना लष्कर-ए-तोयबाची सहयोगी आहे.पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाच मोठे निर्णय घेतले. त्याचवेळी, पाकिस्ताननेही शिमला करार रद्द करण्याची धमकीही दिली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी श्रीनगरला पोहोचले. येथे त्यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमी आणि पीडित कुटुंबांची भेट घेतली. जम्मू-काश्मीरला पोहोचलेल्या राहुल यांनी सांगितले की, सरकारने केलेल्या कोणत्याही कारवाईला आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत.