
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही हात नाही. त्याच वेळी, भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, ज्यासाठी आम्ही आमच्या सैन्याला तयार करत आहोत, असा दावा
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानवर सातत्याने आपली पकड घट्ट करत आहे. भारताने घेतलेल्या निर्णयावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री सोमवारी बोलत होते.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रांमध्ये तणाव वाढत असल्याचे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्याला पाकिस्तानने पाठिंबा दिल्याचा आरोप भारताने केला आहे. त्या घटनेवरून भारतात आजही संताप आहे. यासोबतच पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणीही करण्यात येत आहे. आसिफ म्हणाले की, भारताची वक्तव्ये वाढत आहेत. पाकिस्तानच्या सैन्याने भारतीय हल्ल्याची शक्यता सरकारला कळवली आहे.