२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज (बुधवार, ३० एप्रिल) होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यात बहुतेक पर्यटक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. यासोबतच आज सुरक्षा व्यवहार समिती सीसीएसची बैठकही होणार आहे.
गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाची एकही बैठक झाली नाही आणि फक्त २३ एप्रिल रोजी सुरक्षा विषयक कॅबिनेट समिती (CCS) ची बैठक झाली ज्यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. गेल्या बुधवारी झालेल्या सीसीएस बैठकीनंतर भारताने पाकिस्तानसोबतचे राजनैतिक संबंध कमी करण्यासह अनेक पावले उचलण्याची घोषणा केली होती.
काल म्हणजेच मंगळवारी (२९ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. त्यांनी दहशतवादाविरुद्ध ‘जोरदार प्रहार’ करण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख उपस्थित होते.