विशाखापट्टणम मंदिरात मोठी दुर्घटना

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक मोठा अपघात झाला. विशाखापट्टणममधील श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सव कार्यक्रम चालू होता. यादरम्यान, मंदिराचा २० फूट लांबीचा भाग कोसळला. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि बचावकार्यही सुरू आहे.

बुधवारी सकाळी विशाखापट्टणमच्या मंदिरात चंदनोत्सव सुरू होता. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी मंदिराचा २० फूट लांबीचा भाग कोसळला आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ घटनास्थळी उपस्थित आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री वंगालपुडी अनिता देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. ते म्हणाले, “ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे, सरकारने बचाव कार्य तीव्र केले आहे.”

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *