पाकिस्तानची काश्मीरकडील उड्डाणे रद्द

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. यानंतर पाकिस्तानचा अहंकार दुखावला असल्याचे दिसून येत आहे. पाकिस्तानच्या माहिती मंत्र्यांनी तर रात्री २ वाजता पत्रकार परिषद बोलावली.

भारताकडून हल्ल्याची शक्यता असल्याने पाकिस्तान बुधवारी गिलगिट, स्कार्दू आणि जम्मू-काश्मीरच्या इतर भागांना जाणारी सर्व उड्डाणे रद्द करत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय हवाई सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेतल्यानंतर उत्तरेकडील भागांना जाणाऱ्या उड्डाणांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. परदेशी उड्डाणांवरही कडक देखरेख सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतातून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *