मणिपूरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई

मणिपूरमधील विविध जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई केली.  या जिल्ह्यांमधून १७ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यासह ३१ शस्त्रे, मोठ्या प्रमाणात दारूगोळा देखील जप्त करण्यात आला आहे. संरक्षण प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल अमित शुक्ला यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत लष्कर, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी आणि मणिपूर पोलिसांनी संयुक्त कारवाईत अत्याधुनिक शस्त्रे, १४ सुधारित स्फोटके (आयईडी), अनेक ग्रेनेड, दारूगोळा जप्त केला आहे.जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये सेल्फ-लोडिंग रायफल्स (एसएलआर), दोन सिंगल बॅरल गन, एक बोल्ट अॅक्शन रायफल, सुधारित लाँचर (पोम्पी), एक पिस्तूल, कार्बाइन, एक आयएनएएसएएस रायफल, पीटी.२२ रायफल्स यांचा समावेश आहे.
मणिपूरच्या चार जिल्ह्यांमधून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.  काकचिंग, तेंग्नौपाल, बिष्णुपूर आणि कांगपोक्पी हे ते जिल्हे आहेत.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *