महाराष्ट्रात जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेने राज्यभरातील ५८ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या असून, पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीसाठी आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
मुंबई आणि कोकण विभागातील नियुक्त्या:
उत्तर मुंबई: दीपक तावडे, उत्तर-पूर्व मुंबई: दीपक दळवी, उत्तर-मध्य मुंबई: वीरेंद्र म्हात्रे सिंधुदुर्ग: प्रभाकर सावंत, रत्नागिरी उत्तर: सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिण: राजेश सावंत, रायगड उत्तर: अविनाश कोळी, रायगड दक्षिण: धैर्यशील पाटील, ठाणे शहर: संदीप लेले, ठाणे ग्रामीण: जितेंद्र डाके,भिवंडी: रवीकांत सावंत, मीरा-भाईंदर: दिलीप जैन, नवी मुंबई: डॉ. राजेश पाटील, कल्याण: नंदू परब, उल्हासनगर: राजेश वधारिया,
पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील नियुक्त्या:
पुणे शहर: धीरज घाटे, पुणे उत्तर (मावळ): प्रदीप कंद, पिंपरी-चिंचवड शहर: शत्रुघ्न काटे, सातारा: अतुल भोसले, सोलापूर शहर: रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्व: शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिम: चेतनसिंग केदार, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले): राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम (करवीर): नाथाजी पाटील, सांगली शहर: प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण: सम्राट महाडिक, नागपूर शहर: दयाशंकर तिवारी, नागपूर ग्रामीण: मनोहर कुंभारे (कटोल), अनंतराव राऊत (रामटेक), अमरावती शहर: डॉ. नितीन धांडे, अमरावती ग्रामीण: रवीराज देशमुख, प्रभुदास भिलावकर
या नियुक्त्यांमध्ये पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले असून, काही ठिकाणी स्थानिक आमदार-खासदारांच्या निकटवर्तीयांना संधी देण्यात आली आहे. अद्याप २० जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपदाच्या नियुक्त्या प्रलंबित असून, त्यामागे स्थानिक नेत्यांमधील मतभेद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही संघटनात्मक फेरबदल करण्यात आली असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षाची तयारी अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे .