‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत ९–१० मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर चार ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या हवाई दलाच्या (PAF) अत्यंत महत्त्वाच्या एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमानाचा नाश झाला. या घटनेची पुष्टी पाकिस्तानच्या सेवानिवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांनी केली आहे.
भोलारी एअरबेस, जी कराची पासून सुमारे १०० किमी अंतरावर सिंध प्रांतातील जामशोरो जिल्ह्यात स्थित आहे, ही पाकिस्तानच्या हवाई दलाची एक अत्याधुनिक आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची तळ आहे. या एअरबेसवर भारताने चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली, ज्यामुळे रनवे, हँगर आणि सहाय्यक पायाभूत सुविधा नष्ट झाल्या. या हल्ल्यांमध्ये एक AWACS विमान नष्ट झाले, ज्यामुळे पाकिस्तानच्या हवाई देखरेख क्षमतेला मोठा फटका बसला.
भारताने सेवानिवृत्त एअर मार्शल मसूद अख्तर यांच्या मते, भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांपैकी एकाने भोलारी एअरबेसवरील हँगरवर थेट हल्ला केला, ज्यामध्ये एक AWACS विमान नष्ट झाले. या हल्ल्यात अनेक PAF कर्मचारीही ठार झाले. उपग्रह चित्रांनुसार, भोलारी एअरबेसवरील हँगरमध्ये मोठे भगदाड पडले असून, रनवे आणि इतर पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या दक्षिणेकडील हवाई संरक्षण क्षमतेला मोठा फटका बसला आहे .