राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात

महाराष्ट्रात आजपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, सातारा, आणि कोंकण विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी काही भागांमध्ये यलो अलर्ट जाहीर केला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे काही शाळा व महाविद्यालयांनी सुट्टी जाहीर केली असून, वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रेल्वेसेवा व रस्त्यांची वाहतूक मंदावली आहे.
मुंबईसह इतर महापालिकांनी नालेसफाई, जलनिकासी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी पथक सज्ज ठेवली असल्याची माहिती दिली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. खरीप हंगामासाठी ही सुरुवात शुभ मानली जात आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले असून, शक्यतो घरातच राहावे, विजेपासून दूर राहावे आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.