ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे मोठं पाऊल

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पातळीवर अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. या कारवाईनंतर भारताच्या धोरणात्मक आणि लष्करी दृष्टिकोनात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकारने संरक्षण बजेटमध्ये ५०,००० कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या निधीतून आधुनिक शस्त्रास्त्र, दारूगोळा आणि तंत्रज्ञान खरेदीवर भर दिला जाणार आहे, ज्यामुळे लष्करी क्षमता अधिक बळकट होईल. भारताने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्यासाठी ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ सुरू केली आहे. या अंतर्गत, भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना भेट देऊन पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांची माहिती पोहोचवत आहेत.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी पाकिस्तानकडून पाठवलेल्या ६०० हून अधिक ड्रोनचा यशस्वीपणे नायनाट केला. या कारवाईत ‘आकाश’ आणि ‘आकाशतीर’ सारख्या स्वदेशी प्रणालींचा प्रभावी वापर करण्यात आला . भारतीय नौदलाने कराचीवर हल्ला करण्यासाठी पूर्ण तयारी केली होती, परंतु राजकीय निर्णयामुळे ती कारवाई थांबवण्यात आली. या तयारीमुळे भारताच्या समुद्री सुरक्षेची क्षमता अधोरेखित झाली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, रशियाने भारताला S-500 हवाई संरक्षण प्रणालीच्या संयुक्त उत्पादनाची ऑफर दिली आहे. ही ऑफर भारताच्या संरक्षण क्षेत्रातील स्वावलंबनासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात देशभक्तीची लाट उसळली आहे. दिब्रूगडमध्ये केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली, ज्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *