बांगलादेशातून भूमार्ग आयातीवर भारताचे निर्बंध

भारताने  ईशान्य प्रदेशात, भूमार्गाने बांगलादेशमधून तयार कपडे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यासारख्या काही वस्तूंच्या आयातीवर निर्बंध लादले आहेत. ही आयात फक्त न्हावा शेवा अर्थात जवाहरलाल नेहरू बंदर, नवी मुंबई आणि कोलकाता सागरी बंदरांमधूनच केली जाईल.बांगलादेशातून भारतात आयात केलेले ९३ टक्के तयार कपडे जमिनीच्या मार्गाने येतात.

बांगलादेशसोबतच्या संबंधांमध्ये समानता आणण्यासाठी भारताने हे निर्बंध लादले आहेत, असे सूत्रांनी रविवारी सांगितले. भारताचा हा निर्णय द्विपक्षीय व्यापारात निष्पक्षता आणि समानता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेशातून आयात केलेल्या वस्तूंमध्ये फळे,  चवदार आणि कार्बोनेटेड पेये, प्रक्रिया केलेले स्नॅक्स, चिप्स आणि मिठाई हे अन्नपदार्थ, कापूस आणि कापसाच्या धाग्याचा कचरा, प्लास्टिक आणि पीव्हीसीच्या तयार वस्तू, रंग आणि लाकडी फर्निचर यांचा समावेश आहे. त्यांना आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराममधील कोणत्याही लँड कस्टम स्टेशन आणि एकात्मिक चेक पोस्टद्वारे परवानगी दिली जाणार नाही.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *