संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालात पाकिस्तानातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी, पाकिस्तानच्या बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा येथील ६८ जिल्ह्यांमधील १.१ कोटी लोक पुरामुळे प्रभावित झाले होते, असे या अहवालात म्हटले आहे.
नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत पाकिस्तानच्या ग्रामीण भागातील सुमारे १.१ कोटी लोक तीव्र अन्न असुरक्षिततेच्या विळख्यात होते. हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींमुळे बलुचिस्तान, सिंध आणि खैबर पख्तूनख्वा येथील जीवनावर वाईट परिणाम झाला आहे. १७ लाख लोक आपत्कालीन परिस्थितीत आहेत, जे सर्वात गंभीर पातळींपैकी एक मानले जाते. भारताने सिंधू पाणी करार पुढे ढकलल्यानंतर ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. या वर्षीची परिस्थिती २०२४ पेक्षा अधिक चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.