विधिमंडळ समित्यांचे उद्घाटन

सन २०२४-२५ या वर्षासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी त्यांनी विधिमंडळ समित्यांच्या कामाचे आणि त्यांच्या अहवालांचे महत्त्व अधोरेखित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “समित्यांमुळे प्रशासनाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येते. त्यामुळे या समित्या महत्वाच्या आहेत.  सखोल अभ्यासामुळे शासनास धोरणनिर्धारणात मदत होते.”  विधानमंडळाच्या कामकाजात या समित्यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित मार्गदर्शन केले. विधिमंडळ समित्यांचा अभ्यास म्हणजे लोकशाही सुदृढ करण्याचं प्रभावी साधन असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *