भारताने मालदीवसोबत १३ सामंजस्य करार केले आहेत. मालदीव सरकारकडून परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील व मालदीवमधील भारतीय उच्चायुक्त जी. बालासुब्रमण्यम यांनी या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. या करारांमध्ये फेरी सेवा वाढवणे, सागरी संपर्क वाढवणे आणि मालदीवला १० कोटी रुपयांच्या अनुदानासह सामुदायिक उपजीविका वाढवणे या प्रकल्पांचा समावेश आहे. हे सामंजस्य करार उच्च प्रभाव समुदाय विकास प्रकल्प फेज-३ अंतर्गतच्या प्रकल्पांसाठी आहेत.
मालदीवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला खलील म्हणाले की, “हाती घेतलेले प्रकल्प केवळ पायाभूत सुविधांच्या विकासापेक्षा जास्त आहेत. ते लोकांच्या स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शाश्वत सामाजिक-आर्थिक फायदे देण्यासाठी केलेले आहेत. या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्य आणखी मजबूत होईल. हा प्रकल्प या वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.”