केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी संघटनांशी संवाद साधला. नवी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्र्यांची शेतकरी संघटनांसोबत महत्वपूर्ण बैठक झाली. सिंधू पाणी करार स्थगितीवर सरकारची भूमिका केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केली. सिंधु पाणी करार स्थगिती हा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे भारतातील सिंचन क्षमतेत वाढ होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान पुढे म्हणाले की, “या करार स्थगितीच्या निर्णयाचा सीमेवरच्या शेतकऱ्यांना थेट लाभ होणार आहे. सलाल व बागलीहार धरणातील गाळ काढून वाढणारा पाणीसाठा शेतकऱ्यांसाठी पोषक ठरेल”. ८०% पाणी पाकिस्तानला देण्याच्या जुन्या करारावर हा पुनर्विचार असल्याचे त्यांनी सांगितले.