भारताने पाकिस्तान दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र केला आहे. याकरिता भारताने सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे तयार केली आहेत. या शिष्टमंडळांचे उद्दिष्ट जगासमोर पाकिस्तानचे खरे इरादे उघड करणे आणि भारताची ठाम भूमिका मांडणे हे आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री या शिष्टमंडळांना परदेश दौऱ्यापूर्वी आवश्यक माहिती देतील. हा परदेश दौरा २३ ते २५ मे या कालावधीत पार पडणार आहे.
पहिल्या टप्प्यात संसद भवनात खासदार संजयकुमार झा, श्रीकांत शिंदे आणि कनिमोई करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा पार पडणार आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसकडून अभिषेक बॅनर्जी यांचे नाव सुचवले असून, ते भारताचा एकत्रित आवाज जागतिक स्तरावर सशक्तपणे मांडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.