‘एक देश-एक निवडणूक’ शी संबंधित संसदीय समितीने मुंबईत घेतलेल्या आढावा बैठकीत एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेवर सविस्तर चर्चा केली. एकत्रित निवडणुकांच्या संविधानिक, व्यवस्थापकीय आणि संभाव्य परिणामांबाबत यावेळी सखोल चर्चा झाली. एकाच वेळी निवडणूका झाल्या तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक बचत होईल, सुमारे १५ हजार कोटींच्या बचतीतून अनेक पायाभूत सुविधा उभारता येतील. सरकारांची स्थिरता वाढेल. त्यामुळे गुंतवणूकदार आणि उद्योजकांनांही फायदा होईल, निवडणुकांच्या कामी सतत अडकून राहणारे मनुष्यबळ देखील चांगल्या कामासाठी मोकळे होईल, अशी चर्चा यावेळी झाली.
ही बैठक खासदार पी. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि प्रमुख अधिकारी सहभागी झाले होते. ही समिती ३० राज्यांमधे जाऊन लोकप्रतिनिधींच्या सूचना जाणून घेत आहे. त्यावर पारदर्शक पद्धतीने अहवाल सादर केला जाईल, असे चौधरी यांनी सांगितले