पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा

राज्य सरकारने आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांसाठी एक ऐतिहासिक घोषणा केली आहे. या पत्रकार परिषदेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
५०,००० कोटींची कर्जमाफी योजना – २०२५ पूर्वीचे थकीत पीककर्ज संपूर्णपणे माफ. हमीभावात वाढ – गहू, तांदूळ, सोयाबीन व कांद्याच्या हमीभावात ₹३०० प्रती क्विंटल वाढ. ‘डिजिटल शेतकरी’ योजना सुरू – मोबाईल अॅपद्वारे खत, बियाणे, हवामान माहिती आणि पीक विमा अर्ज सुलभ. सौरऊर्जेवर आधारित पंप अनुदान – ७५% अनुदानासह १ लाख शेतकऱ्यांना लाभ. कृषी केंद्र सुरू करण्यासाठी अनुदान – युवकांसाठी “शेतकरी स्टार्टअप योजना” अंतर्गत ₹५ लाख पर्यंत मदत.