
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवरील ‘हरिहरेश्वर’ हा एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध श्री हरिहरेश्वर मंदिर या समुद्राच्या काठावर वसलेले आहे. निसर्गरम्य सौंदर्य, प्रसन्न वातावरण आणि स्वच्छ पाण्यासाठी हा समुद्रकिनारा ओळखला जातो. हा समुद्रकिनारा टेकड्यांनी वेढलेला आहे. सूर्यस्नान, जलक्रीडा आणि पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी हे लोकप्रिय ठिकाण आहे. जवळपास अनेक मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे देखील आहेत, ज्यामुळे ते हिंदू भाविकांचे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र बनले आहे. याव्यतिरिक्त स्वादिष्ट खाद्यपदार्थ देणारी बरीच स्थानिक दुकाने आणि उपहारगृहे आहेत. ज्यामुळे मित्र आणि कुटुंबासह आरामशीर दिवस घालविण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

महाराष्ट्राची ‘सावित्री’ नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तेथे ‘हरिहरेश्वर’ नावाचे हे गाव आहे. हे कोकणपट्टीतील एक निसर्गरम्य असे पवित्र तीर्थस्थान ! एका बाजूला हिरव्यागार वनश्रीने नटलेला डोंगर, तर दुसऱ्या बाजूला नयनरम्य स्वच्छ निळा समुद्र व रुपेरी वाळूने आकर्षित करणारा अमर्याद समुद्रकिनारा असे याचे वर्णन करता येईल. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते. आयुष्यातील चिंता, काळजी यांना तात्पुरता का होईना, पूर्णविराम मिळतो. रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान ‘दक्षिण काशी’ म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ‘ब्रह्मगिरी’, ‘विष्णूगिरी’, ‘शिवगिरी’, ‘पार्वती’ या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. गावाच्या उत्तरेकडे हरिहरेश्वराचे देऊळ आहे. या समुद्रकिनार्याला आवर्जून भेट द्या.