नागपूरचा सीताबर्डी किल्ला

‘सीताबर्डी’ हा महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील किल्ला आहे. येथील टेकडीचे रूपांतर इंग्रजांनी किल्ल्यात केले. या किल्ल्यावर तोफखाना व दारुगोळा असे. या किल्ल्यावर तेव्हा अरब सेनेने हल्ला चढविल्याची नोंद आहे. हा किल्ला नंतर लष्कराच्या ताब्यात देण्यात आला.

वर्षातून फक्त तीन दिवस याचा काही भाग जनतेसाठी खुला करण्यात येतो. दि.२६ जानेवारी व १५ ऑगस्ट व १ मे रोजी येथे जाता येते. या किल्ल्याचे बांधकाम काळ्या दगडात केलेले आहे.

‘सीताबर्डी’ शब्दाचा अर्थ ‘ सीतेची टेकडी’ असा होतो. सीताबर्डी किल्ला गोंड राजा भक्त बुलंदशाह याने इ. सन 1702 मध्ये बांधला होता.

त्यानंतर तिसऱ्या अँग्लो-मराठा युद्धादरम्यान ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढण्यापूर्वी हा किल्ला मराठ्यांकडे होता.

टेकडीच्या आजूबाजूचा परिसर, हे नागपूरचे महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. ‘सीताबर्डी’ किल्ला नागपुरातील एक प्रमुख पर्यटन आकर्षण असून दोन टेकड्यांवर वसलेला आहे.

हे ठिकाण सुरुवातीला ‘शितलबद्री’ म्हणून ओळखले जाऊ लागले, जे ब्रिटीश राजवटीत ‘सीताबर्डी’ बनले. नंतर त्याचे सध्याचे रूप ‘सीताबर्डी’ प्रचलित झाले. नागपूरचे अप्पासाहेब भोसले आणि इंग्रज यांच्यात या डोंगरावर नोव्हेंबर १८१७ मध्ये ‘सीताबर्डी’ची लढाई झाली. आप्पासाहेब भोसले यांच्या सैन्याने तीन दिवस दिलेल्या निकराच्या लढ्यानंतर २८ नोव्हेंबर १८१७ ला हा किल्ला ब्रिटिश लष्कराच्या ताब्यात गेला. त्यावेळी येथे किल्ला नव्हता. त्याला ‘बडी टेकडी’ संबोधले जात. पुढे ब्रिटिशांनी त्याला किल्ल्याचे स्वरुप दिले.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *