
भारतामध्ये प्राचीन काळापासून शरीराच्या काही भागांना मालिश करण्यात येते. हात, पाय आणि नाभी अर्थात बेंबीच्या ठिकाणी तेलाने मालिश केल्यास अनेक फायदे मिळतात. पारंपरिकतेनुसार नाभीमध्ये तेल घालणे हे अधिक योग्य असून आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे नाभीमध्ये तेल घालून मालिश केल्याने पोटातील दुखणे कमी होते. मोहरीच्या तेलामध्ये आल्याचा रस अथवा आल्याचा किस मिसळून बेंबीमध्ये या तेलाचे ३-४ थेंब घालावेत. यामुळे पोटात होणारी मळमळ, उलटीसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. बरेचदा आंघोळ करताना बेंबीचा भाग हा दुर्लक्षित होतो; मात्र बेंबीमध्ये रात्री तेल घातल्यास स्वच्छ करणे लक्षात राहते. नाभीत साचलेला मळ काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. तेलामुळे नाभी स्वच्छ राहते.

योगा आणि आयुर्वेदानुसार, शरीराचे चक्र हे नाभीपासूनच सुरू होते. त्यामुळे शरीराचे संतुलन राखण्यासाठी नाभीमध्ये तेल घालून मालिश करण्यात येते. नाभीत तेल घातल्याने त्वचेचे आरोग्यही संतुलित राहते. यामुळे त्वचेला अधिक चमक येते, असेही सांगण्यात येते. डोके शांत ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. सांधेदुखीपासून सुटका मिळते. चेहऱ्यावर चमक यायला हवी असेल तर नारळ अथवा बदामाचे तेल नाभीमध्ये घालू शकता. यामुळे त्वचेला अधिक चमक येते. लवकरच कोरडी त्वचाही मऊ आणि मुलायम होते. रोज रात्री ३ थेंब नारळाचे अथवा बदामाचे तेल नाभीमध्ये घातल्यास फायदा होईल.
पोटातील दुखणे कमी करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी आणि कंबरदुखीपासून आराम मिळण्यासाठी बदाम तेलाचा वापर करावा. नाभीत मोहरीचे तेल घातल्याने अनेक गोष्टींपासून सुटका मिळते. फाटलेल्या ओठांसाठी, डोळ्यांच्या चांगल्या दृष्टीसाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी अथवा डोकेदुखीपासून सुटका मिळविण्यासाठी २-३ थेंब मोहरीच्या तेलाचा वापर रोज रात्री करावा.