
महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यातील व्रजेश्वरी परिसरात ‘मंदाकिनी’ पर्वताच्या पायथ्याशी व्रजेश्वरी योगीनी देवीचे सुंदर मंदिर आहे. विरार पूर्व-भिवंडी-अंबाडी रस्त्यावर असलेले हे ठिकाण गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीचा पृष्ठभाग विलग झाल्यावर तो वितळलेल्या मॅग्माच्या रूपात ज्वालामुखीतून बाहेर पडतो. काही वेळा तो गरम पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या रूपात बाहेर येऊन आपल्याला आश्चर्यचकित करतो. तशा प्रकारचे हे उदाहरण आहे.
नंतरच्या काळात झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे ‘मंदाकिनी’ पर्वताची निर्मिती झाली असे म्हटले जाते. ‘तानसा’ नदीच्या काठावर वसलेला हा परिसर विविधतेने परिपूर्ण आहे. या तानसा नदीच्या एका टोकाला व्रजेश्वरी नगराच्या मुख्य चौकात ‘वज्रेश्वरी योगिनी देवीचे मंदिर’ आहे. या मंदिराच्या नावावरूनच शहराचे नाव पडले आहे. रस्त्यावरून मंदिरात जाण्यासाठी ५२ पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या मुख्य दरवाजाकडे जाणा ऱ्या अर्ध्या वाटेवर एक सोनेरी रंगाची कासवाची मूर्ती आहे, जी देवाच्या कूर्म-अवताराचे प्रतीक आहे असे मानले जाते.
या मंदिराबाबत एक कथा सांगितली जाते. सन १७३९ मध्ये वसई संस्थान पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी ताब्यात घेतले. मराठा पेशवे बाजीराव-पहिला यांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा हे वसई संस्थानातील लोकांना पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्यासाठी वसई किल्ला जिंकण्यासाठी निघाले. पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये सुमारे तीन वर्षे युद्ध झाले, पण वसईचा किल्ला जिंकता आला नाही. त्यानंतर चिमाजी अप्पांनी ‘वज्रेश्वरी’ देवीची पूजा केली. असे मानले जाते की पूजेनंतर देवीने त्यांना वसई किल्ला जिंकण्याचा मार्ग स्वप्नात सांगितला. वज्रेश्वरी देवीने सांगितलेल्या मार्गाने लढून मराठ्यांनी वसईचा किल्ला जिंकला, व पोर्तुगीजांचा पाठलाग केला. विजयानंतर चिमाजीअप्पांनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर बांधले. त्यांच्या शौर्याची गाथा आजही मंदिराच्या मुख्य दरवाजावर सुवर्ण अक्षरात कोरलेली आहे.

शस्त्रावरून तिला वज्रेश्वरी देवी असे नाव पडले. मुख्य मंदिराचे गर्भगृह दगडांनी बांधलेले आहे. मंदिराच्या मध्यभागी मंडप आहे. या मंडपात दगडी कोरीव तीन दरवाजे आहेत. यामध्ये नारदमुनींची मूर्ती मुख्य मानली जाते. गर्भगृहाच्या दरवाजाच्या दोन्ही बाजुना जय-विजयची मूर्ती आहे. शास्त्रात जय-विजय हे भगवान विष्णूचे अंगरक्षक मानले गेले आहेत. मंदिराच्या गर्भगृहात वज्रेश्वरी देवीची मूर्ती आहे. देवीच्या हातात तलवार आणि गदा आहे. भगवान परशुरामाची आई रेणुका देवीची येथे मूर्ती आहे. तिसरी मूर्ती सप्तशृंगी देवीची आहे, जी आदिशक्ती महिषासुर-मर्दिनी होती.
धर्मग्रंथात आढळलेल्या उल्लेखानुसार, ‘कल्लिका’ राक्षसाच्या गैरवर्तनाने सर्व ऋषीमुनी त्रस्त झाले. त्यानंतर महर्षी वशिष्ठांनी यज्ञ केला. ऋषी-मुनींच्या त्यागाने आदिशक्ती प्रसन्न झाली. त्या यज्ञामध्ये देवांचा राजा इंद्राचा यज्ञ केला गेला नाही. त्यामुळे इंद्र क्रोधित झाला. त्याने आपल्या ‘वज्र’ नावाच्या शस्त्राने ऋषीवर हल्ला केला. गडगडाट येत असल्याचे पाहून सर्व ऋषी-मुनी घाबरले. त्यानंतर सर्वांनी देवीची स्तुती केली. आदिशक्तीने आपल्या आश्रयाने सर्वांचे रक्षण केले.म्हणून तिचे नाव ‘वज्रेश्वरी’ पडले.
अशीही एक आख्यायिका सांगितली जाते, की इंद्राने ‘कल्लिका’ या राक्षसावर वज्रप्रहार केला. जेव्हा कल्लिकाने इंद्राची वज्रक्रिया निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देवीने स्वतःच वज्रांमध्ये लीन होऊन कल्लिका राक्षसाचा वध केला. त्यामुळे आदिशक्तीचे एक नाव ‘व्रजेश्वरी’ देखील पडले.