
पिवळ्या – केशरी रसरशीत आंब्यांचा हंगाम सुरु झाला आहे. आंब्यांनी बाजारातील आपली जागा घेण्यास सुरुवात केली आहे. आंबा जेवढा मधूर आहे, तेवढाच तो आरोग्यवर्धकही आहे. त्या त्या हंगामात पिकणारी फळे ही खायलाच हवीत; कारण निसर्गतःच ती येत असतात. त्यांची शरीराला गरज असते.
आंब्यामुळे शरीरातील नसा, ऊती आणि स्नायू मजबूत होतात. पोट साफ होत असल्याने शरीराची आतून स्वच्छता होते. ‘जीवनसत्व बी 6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते. हृद्यविकाराचा धोका कमी होतो.

आंबा ‘मॅग्नेशियम’ आणि ‘पोटॅशियम’ने समृद्ध असतो. त्यात ‘अँटिऑक्सिडंट्स’ही असतात. यामुळे हृदय दीर्घकाळ निरोगी राहते. आंब्यामधील ‘अ’ जीवनसत्व डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या घटकांमुळे दृष्टी चांगली राहते. आंबा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. आंब्यामध्ये शरीरासाठी उपयुक्त अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हे घटक शरीराला आजारांशी लढण्यास मदत करतात. आंब्यामध्ये कॅलरीज कमी असल्याने मधुमेहाची भीती नसते, तरीही मधुमेही रुग्णांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
आंब्याचा रस चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा चमकदार होतो. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चरबी कमी करण्यासाठी आंबा उपयुक्त आहे; कारण आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी लागते. त्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.