Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मुलांचे अति लाड नको

आचार्य चाणक्य यांनी केवळ राजकारणच नव्हे, तर जीवनातील अनेक बाबींवर भाष्य केले आहे. माणसाने जीवनात या शिकवणींचे पालन केल्यास त्याला समाधान लाभू शकते.

आपली मुले गुणवान असावीत असे प्रत्येक आई – वडिलांना वाटत असते. आचार्य चाणक्य यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे. ते पालकांना सांगतात की, अति लाड केल्याने मुलांमध्ये अनेक दोष निर्माण होतात. मुलांना सहन होऊ शकेल अशी छोटी शिक्षा करावी किंवा त्यांची परीक्षा घ्यावी. त्यामुळे त्यांच्यात जीवन जगण्याचे गुण विकसित होतात.

मुले आणि विद्यार्थी यांचे कधीही मर्यादेपलीकडे लाड करू नयेत. त्यांना कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम केले पाहिजे. मुलांचे लाड करावेत, परंतु जास्त लाड घातक ठरतात, हेही लक्षात घ्यावे. पालकांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे. लाड करताना मुलांच्या चुकांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. मुलांनी काही चुकीचे काम केले, गैरकृत्य केले, तर त्यांना अगोदर पटवून द्यावे. मुलांना चुकीच्या कृत्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालकांनी मुलांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *