
महाराष्ट्रात ‘कोथळीगड’ हा एक किल्ला आहे. याला ‘कोटलीगड’ किंवा ‘कोथळीगड’ देखील म्हणतात. हा राज्यातील कर्जतच्या पूर्वेला असलेला एक छोटासा किल्ला आहे. या किल्ल्यावर चढाई करणे त्यामानाने सोपे आहे. पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ गावाजवळ हा किल्ला असल्याने याला ‘पेठचा किल्ला’ असेही म्हणतात. किल्ल्याच्या पायथ्याशी एक लहान मंदिर आणि मोठी गुहा आहे. हे शिखर आतून कोरलेले असून माथ्यावर जाण्यासाठी एक जिना बनविला आहे. गुहेपासून काही अंतरावर पाण्याचा बांधलेला हौद असून गडाच्या माथ्यावर असाच आणखी एक हौद आहे.
ही गुहा आणि मंदिराचे कोरीवकाम साधारणपणे इसवी सन 13 व्या शतकातील आहे. सन 18 व्या शतकापर्यंतच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती नाही. इसवी सन 1716 मध्ये ही गुहा इंग्रजांनी ताब्यात घेतली. 2 नोव्हेंबर 1817 रोजी बाजीरावांनंतरच्या पिढीतील बापूरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी ती पुन्हा ताब्यात घेतली. कॅप्टन ब्रुक्सच्या नेतृत्वाखाली, पुढच्याच महिन्यात, 30 डिसेंबर 1817 रोजी ब्रिटीशांनी पुन्हा तिच्यावर वर्चस्व मिळविले. सन 1862 पर्यंत इंग्रजांनी हा किल्ला आजूबाजूच्या दऱ्या आणि सभोवतालच्या टेकड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘चौकी’ म्हणून ठेवला होता.

हा किल्ला नसून एक प्रकारचे दीपगृह आहे. येथून दिशानिर्देश देण्यात यायचे. मराठ्यांच्या मोठ्या प्रांतातील ‘मावळ’ भागावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग करून घेतला जात असे. छोट्या पण भक्कम टेकडीवर उभा असलेला हा ‘वॉच टॉवर’ उभारण्यामागे मराठा योद्ध्याची दूरदृष्टी दिसून येते. गडावरील गुहा हे रात्र घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. हा किल्ला पाहण्यासाठी हवाईमार्गाने जायचे झाल्यास मुंबई विमानतळावर उतरावे लागेल. रेल्वेने गेल्यास कर्जतला उतरावे लागेल.