Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

रसाळगड किल्ला

रसाळगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीला समांतर जाणाऱ्या डोंगररांगेच्या दक्षिण टोकावर हा किल्ला आहे. हा किल्ला सुमारे ५ एकर परिसरात पसरलेला आहे. किल्ल्यावर ‘सोलाई’ आणि ‘वाघाई’ या दोन देवींची मंदिरे आहेत. गडावर सुरेख कोरीवकाम आहे. किल्ल्याच्या उत्तर-पश्चिम बाजूस एक जुनी वास्तू आणि पाण्याची टाकी आहे.

येथे एक दगडी शिलालेख आहे. त्याच कोपऱ्यात बालेकिल्ला असून त्यात ‘भांडार’ आणि ‘राजवाडा’ आहे. दक्षिणेकडील गुहेत एक पाण्याची टाकी असून त्याला 4 खांब आहेत. किल्ल्याच्या काही बुरुजांवर तोफा आहेत. येथे एक मोठी दगडी दीपमाळ आहे. प्रवेशद्वारावर हनुमानाचे दुर्मिळ दगडी शिल्पदेखील आहे.

हा किल्ला प्राचीन आहे. किल्ल्याचा ज्ञात इतिहास शिवरायांच्या काळापासून सुरू होतो. जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला, त्यावेळी तो जावळीच्या मोरेंच्या हद्दीत होता. त्यानंतर १८१८ मध्ये पेशव्यांच्या हातून ब्रिटिशांच्या हाती गेला.

सन २००३ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने ‘रसाळगडा’ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. विभागाकडून किल्ल्यात काही जीर्णोद्धाराचे काम करण्यात आले आहे; परंतु मूळ वास्तू खराब झाल्याच्या तक्रारी आहेत. या कामात सौंदर्याचा अभाव आहे. येथे विमानाने जायचे झाल्यास मुंबई सर्वात जवळचे विमानतळ आहे. रेल्वेने गेल्यास खेड हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. रस्त्याने गेल्यास मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथून थेट एसटी बसने खेडला जाता येते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *