
महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ अप्रतिम असा ‘आंजर्ले’ सागरकिनारा आहे. आपली सुट्टी कोकणात आपल्या प्रिय व्यक्तींसोबत घालवायची असेल तर ‘आंजर्ले’ समुद्रकिनाऱ्याची निवड करायला काहीच हरकत नाही. या किनाऱ्यावर काळ्या आणि पांढऱ्या वाळूचे एकत्रीकरण दिसते. आंजर्लेतील प्रमुख आकर्षण म्हणजे ‘काड्यावरचा गणपती मंदिर’ हे आहे. हे मंदिर गणेशमूर्ती आणि मंदिरासमोर भव्य बांधलेले तलाव यासाठी प्रसिद्ध आहे. या मंदिरातून तुम्ही समुद्रकिनाऱ्याचे उत्तम दर्शन होते.

आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून जवळ श्री व्याघ्रेश्वर आणि श्री केशवराज यांची प्राचीन मंदिरे आहेत. जी आंजर्लेपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावर आहेत. परशुराम भूमी हे येथील आणखी एक प्रमुख आकर्षण आहे. येथे श्री परशुरामांची मोठी मूर्ती आहे. येथील भिंतीवर श्री परशुरामावरील संस्कृत श्लोक दिसतील. वर्षभरात कधीही आंजर्ले समुद्रकिनाऱ्याला भेट देऊ शकता, परंतु याठिकाणी भेट देण्याची सर्वोत्तम वेळ नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आहे. हिंदू ‘माघ’ महिन्यात ‘काड्यावरचा गणपती’ मंदिरात गणपतीचा उत्सव आयोजित केला जातो. या कालावधीनंतर भेट देण्याची योजना आखल्यास, मार्चमध्ये होळीचा रंगीबेरंगी सण अनुभवता येईल. आंजर्लेच्या किनाऱ्यावर रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने पोहोचता येते. दापोली हे आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून जवळचे प्रमुख शहर आहे. येथून आपण बसने जाऊ शकता. रेल्वेने गेल्यास खेडला उतरावे लागेल. दापोली ते खेड हे अंतर २९ किलोमीटर आहे. आंजर्ले समुद्रकिनाऱ्यापासून मुंबई हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. हे प्रवासाचे अंतर अंदाजे 230 किलोमीटर आहे.