Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

साताऱ्यात पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषदेचे उद्घाटन

सातारा येथे नवउद्योजक घडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन झाले.

नारायण राणे म्हणाले, ”जिल्हा पातळीवर मोठे उद्योग सुरू व्हावेत यासाठी सरकार नेहमीच प्रोत्साहन देत आहे. आयात होणारी उत्पादने जास्तीत जास्त प्रमाणात देशात उत्पादित झाली तर आपला आयातीवर होणारा खर्च कमी होईल.” विशेष प्रशिक्षण केंद्र आणि उद्योजकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले.

नवीन उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास भागवत कराड यांनी व्यक्त केला. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना ‘उद्यमतारा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रधामंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य धनादेश लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आले.

या उद्योग परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक छोटे-मोठे उद्योजक सहभागी झाले होते. परिषदेच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध उद्योजकांच्या स्टॉल्सनाही केंद्रीय मंत्र्यांनी भेट देऊन त्यांच्या एकंदर समस्या आणि उत्पादन याबाबत चर्चा केली.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *