
यमुना नदीची दुर्दशा चिंताजनक झाली आहे. प्रचंड प्रदूषणामुळे उन्हाळ्यात ही नदी कोरडी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत या नदीबाबत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी ‘यमुना संसदे’चे अधिवेशन आयोजित केले असून ते ४ जूनला होणार आहे. या संसदेत उत्तर प्रदेशसोबत दिल्लीतील ग्रामपंचायती आणि लोकांचाही समावेश असेल.
राष्ट्रीय हिंदू शक्ती संघटना, दिल्ली प्रदेशचे राष्ट्रीय संयोजक संजय अरोरा, दिल्ली पंचायत संघाचे प्रमुख आणि यमुना संसदचे सह-संयोजक थान सिंह यादव सांगतात की,”एक काळ असा होता की, यमुना नदीवर स्नानासाठी जत्रा भरायची. आज यमुनेची अवस्था फार दुख:दायक झाली आहे.” 4 जून रोजी यमुनेवर उभारण्यात येणाऱ्या मानवी साखळीत उत्तर प्रदेशचा सहभाग कायम ठेवला जाईल. यमुनास्नानाच्या दिवशी पुन्हा जत्रा आयोजित होईपर्यंत ‘यमुना संसद’ जिवंत ठेवली जाईल, असे संजय अरोरा यांनी सांगितले.

दुसरीकडे, थान सिंह यादव म्हणाले की, “दिल्लीतील एक नदी जिथून निघते तिथून हा कार्यक्रम होतो. तिला प्रशासनाने नाल्याचे नाव दिले. ‘साहिबी’ नदी असे तिचे नाव आहे. दिल्लीतील सुंदर नद्या सातत्य आणि शुद्धतेने पुन्हा वाहताना दिसल्या पाहिजेत.” लोकसंसदेचे निमंत्रक आणि यमुना संसदचे संयोजक रविशंकर तिवारी यांच्या आवाहनावर ही संसद आयोजित करण्यात येत आहे. यमुना नदीवर 4 जून रोजी सकाळी 6.30 वाजता मानवी साखळी तयार होणार आहे. या दरम्यान लोक मोठ्या संख्येने जमतील. त्याचबरोबर दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील जनतेने यमुना स्वच्छ करण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.