
अलिबागमधील आवास समुद्रकिनारा हा सर्वात कमी गर्दीचा आहे. येथे संपूर्ण शांतता आणि निर्मळता अनुभवता येते. शहरी जीवनातील त्रासापासून हा किनारा दूर आहे. जर तुम्ही गर्दीत जाणे टाळत असाल तर हे एक अप्रतिम ठिकाण आहे.
येथे मनसोक्त फिरू शकता. सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. आवास समुद्रकिनारा अजूनही फारसा प्रसिध्दीस पावलेला नाही. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशा गोष्टी येथे नाहीत. या वालुकामय समुद्रकिनाऱ्यावर एकांतात दर्जेदार वेळ घालवणे हे पर्यटकांना आकर्षित करण्यासारखेच आहे. तुम्ही येथे आराम करू शकता आणि सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. आवास किनारा हा किहिम किनाऱ्याजवळ आहे. कनकेश्वर देवस्थान मंदिर हे येथून जवळचे एक आकर्षण आहे. हे जुने शिवमंदिर डोंगराच्या माथ्यावर आहे. चढाई काहींसाठी दमछाक करणारी असली तरी, तेथे पासेहोचल्यावर तुम्ही सगळा शीण विसरुन जाल.

अलिबाग शहरातून तुम्हाला आवास किनाऱ्यावर जाण्यासाठी वाहने असतात. पुणे आणि मुंबई ही अलिबागच्या जवळची 2 प्रमुख शहरे आहेत.