राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था

‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ ही संस्था ‘निरी’  या नावाने ओळखली जाते. सन १९५८ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत असलेली ही संस्था आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या या संस्थेचे कार्यालय नागपूर येथे सन १९५८ पासून सुरु झाले.

देशात पर्यावरण संतुलनाच्या दृष्टी कामे करण्याऱ्या ज्या अनेक संस्था आहेत, त्यातील एक आघाडीची संस्था म्हणजे ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था’ आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात पाणी पुरवठा, सांडपाण्याचे निर्मुलन अशा पर्यावरणाच्या दृष्टीने कारखान्यांवर नजर ठेवणे हा  या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. ‘निरी’ ही पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील देशातील पहिली प्रयोगशाळा आहे.  ‘निरी’ च्या देशात चेन्नई ,दिल्ली, हैदराबाद , कोलकत्ता आणि मुंबई येथे पाच ठिकाणी प्रयोगशाळा आहेत.

नैसर्गिक समतोल दीर्घकाळ धोक्यात येऊ नये, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, आणि निरोगी वातावरणाचे फायदे सर्वांना मिळावेत, यासाठी ही संस्था काम करते. पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन क्षेत्रात राष्ट्रीय आणि जागतिक नेतृत्व प्रदान करते. पर्यावरण आणि नैसर्गिक संसाधनांच्या समस्यांवर नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाय प्रदान करून मानवजातीच्या सेवेसाठी कार्यरत आहे.  व्यक्ती आणि संस्थांना नैसर्गिक संसाधनांचा उत्पादक बनवून शाश्वत वापर साध्य करण्यासाठी सक्षम करते.

पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्रात शोध कार्य करणे, कारखाने आणि शासनाला पर्यावरण संबंधित समस्येला मदत करणे , शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी बगीचे, झाडे तसेच शेतीकरिता वापरणे, इत्यादीकरिता ही संस्था उपक्रम राबविते.

‘निरी’ चा व्याप व कार्य फार मोठे आहे. पाणी क्षेत्रातील कामामध्ये संस्थेचे योगदान आहे. आज सगळीकडे पाण्याची समस्या भेडसावत आहे. अशा परिस्थितीत सांडपाण्यावर प्रक्रिया करून तेच पाणी पुनःपुन्हा वापरणे हाच एक मार्ग असतो. ‘निरी’ ने आश्रम शाळा आणि वसतिगृहातील निघणाऱ्या सांडपाण्याचे शुद्धीकरण करण्याचे तंत्र शोधून काढले. असे अनेक शोध या संस्थेने लावले आहेत.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही नागपूरच्या पाच प्रादेशिक प्रयोगशाळांपैकी एक आहे. आपल्या 47 वर्षांच्या अस्तित्वात या पयोगशाळेने पर्यावरण निरीक्षण, पर्यावरण जैवतंत्रज्ञान, घातक कचरा व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, पर्यावरणीय प्रभाव आणि जोखीम मूल्यांकन आणि पर्यावरण लेखापरीक्षण यासारख्या संशोधन आणि विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *