महाबीज

 

शेतकऱ्यांचे महामंडळ समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची स्थापना राज्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर दरात विविध बियाणे उपलब्ध होण्यासाठी करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्यालय अकोला येथे आहे. या महामंडळाची स्थापना हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीत सन १९७१ मध्ये झाली. ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ म्हणजेच ‘महाबीज’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. या महामंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे. ‘शेतकऱ्यांची संस्था’ अशी या महामंडळाची ओळख आहे.

प्रचलित वाणांचे गुणवत्तापूर्वक बियाणे मिळण्याच्या उद्देशाने साधारणतः सन 1960 च्या दरम्यान शासनाने तालुका बीज गुणन केंद्राची स्थापना केली होती. या केंद्रावरून उत्पादित बिंयाणे शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येत होते. या बियाण्यापासून अधिक उत्पादन मिळू लागल्यामुळे शेतकऱ्यांचा बियाणे वापरण्याकडील कल वाढू लागला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीने खात्रीचे बियाणे उपलब्ध व्हावे, या प्रमुख उद्देशाने ‘महाबीज’ची स्थापना करण्यात आली.

महामंडळाच्या संशोधन आणि विकास विभागाने संशोधनास सुरुवात केली. अथक प्रयत्नांतून संकरित ज्वारी महाबीज-7, मूग उत्कर्षा, संकरित देशी कपाशी-महाबीज 904 तसेच भाजीपाला पिकांमध्ये भेंडी, भोपळा, चवळी, दोडक्यासह इतर संशोधित वाण उपलब्ध करण्यात आले आहेत. महामंडळाने अकोला, खामगाव व नागपूर येथे फुलझाडे, फळझाडे आणि शोभिवंत झाडे व रोपांची वितरण व्यवस्था केली आहे.

सुधारित वाणांपेक्षा संकरित वाणापासून भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या संकरित बियाण्यांच्या मागणीत वाढ झाली. अकोला येथे 28 एप्रिल 1976 ला राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ अर्थातच ‘महाबीज’ची स्थापना केली. अकोल्यातील कृषीनगर भागात ‘महाबीज’चे मुख्यालय आहे. ‘महाबीज’ च्या मुख्यालयाला लागून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा विस्तीर्ण परिसर आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *