महानायक अमिताभ भावूक झाले

”प्रिय मित्रांनो, आता आम्ही निरोप घेत आहोत. उद्यापासून हा मंच सजणार नाही. आज हा खेळ संपत आहे. या प्रवासाला सुरुवात करताना एक दिवस हा खेळ संपेल, असे विचार मनात येत होते. मी हा विचार विसरून स्पर्धकांच्या आनंदात मग्न होत गेलो. प्रत्येक शेवट एका नव्या सुरुवातीला जन्म देतो,” हे बोल महानायक अमिताभ बच्च्न यांचे आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ च्या शेवटच्या भागावेळी अमिताभ बच्चन खूप भावूक झाले होते. या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागासाठी विद्या बालन, शीला देवी, शर्मिला टागोर आणि सारा अली खान यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

प्रेक्षकांना ‘शुभ रात्री’ म्हणताना अमिताभ यांना अश्रू अनावर झालेले दिसले. या सर्व पाहुण्यांनी बिग बींसोबतचे मजेदार किस्से सांगितले. आपल्या बालपणावरील अमिताभजींच्या प्रभावाबद्दल विद्या बालन यांनी किस्से सांगितले. सारा अली खाननेही बालपणीची आठवण सांगितली. हा व्हिडिओ पाहताना महानायक रडू लागले. त्यामुळे केबीसीचा अवघा मंच भावुक झालेला पहायला  मिळाला.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *