कुक्कुटपालन उद्योग

18Apr, 2024
पोल्ट्री उद्योगाचा विचार करता त्याची व्याप्ती खूप विस्तृत आहे. बहुतेक वेळा जेव्हा पोल्ट्री उद्योगाबद्दल बोलले जाते, तेव्हा फक्त मांस विक्रीचा विचार करतात. परंतु हे फक्त तेवढ्यापुरते मर्यादित नाही.
भारतात बदक पालन, कुक्कुटपालन हे मर्यादित क्षेत्रात केले जाते. ही एक घरामागील शेतीची पद्धत आहे. जी लहान कुटुंबांसाठी खूप उपयुक्त आहे. हे पक्षी स्वयंपाकघरातील टाकावू पदार्थ खाऊन वाढतात. छोट्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देतात.
दुसरीकडे, पोल्ट्री उद्योग इतका मोठा आहे, जिथे तुम्ही लाखो पक्ष्यांची चर्चा करतात. त्यात दोन प्रकारचे उद्योग आहेत. एक ब्रॉयलर उद्योग जो मांसासाठी केला जातो, तर दुसरा अंडी उत्पादनासाठी तयार केला जातो. या व्यतिरिक्त, ब्रीडर पक्षीपालन केले जाते, जेथे लेयर आणि ब्रॉयलर पिल्ले तयार केली जातात.
शेतीची अनेक उप-उत्पादने आहेत जी मानवांसाठी नाहीत. ती पोल्ट्री फीडसाठी वापरली जातात. मका, सोयाबीन केक, मस्टर्ड केकचा वापर कुक्कुटपालनासाठी केला जातो. जेव्हा लहान शेतकरी कुक्कुटपालन सुरू करतो तेव्हा त्याने चांगल्या कंपनीचे खाद्य खरेदी करावे. हा उद्योग करण्यासाठी पक्ष्यांच्या लसीकरणापासून ते आहारापर्यंतची संपूर्ण माहिती तुम्ही मिळवायला हवी. तुम्हाला फक्त शिकत रहावे लागेल.
विशेषत: जे लोक शेतीसह कुक्कुटपालन करतात, आणि स्वतःच्या शेतात खाद्यासाठी धान्य पिकवू शकतात, असे शेतकरी स्वतःचे फीड तयार करणे सुरू करू शकतात. फीडचे दोन प्रकार आहेत. एक कच्चा म्हणजे ‘मॅश फीड’ आणि एक ‘पेलेट फीड’. आपण ‘मॅश फीड’पासून सुरुवात करू शकता. अन्यथा स्वत: पीक घेतले तर उत्पादन खर्च भरून कंपनीकडून तयार केलेले पेलेट फीड मिळवू शकता.
विशेषत: जे लोक शेतीसह कुक्कुटपालन करतात, आणि स्वतःच्या शेतात खाद्यासाठी धान्य पिकवू शकतात, असे शेतकरी स्वतःचे फीड तयार करणे सुरू करू शकतात. फीडचे दोन प्रकार आहेत. एक कच्चा म्हणजे ‘मॅश फीड’ आणि एक ‘पेलेट फीड’. आपण ‘मॅश फीड’पासून सुरुवात करू शकता. अन्यथा स्वत: पीक घेतले तर उत्पादन खर्च भरून कंपनीकडून तयार केलेले पेलेट फीड मिळवू शकता.
दोन्हीमधील फरक पाहिला तर, ‘मॅश फीड’ हे एक प्रकारचे कच्चे धान्य आहे. लसीकरण ही कुक्कुटपालनाची सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रोग होतात. जर आपण ब्रॉयलर्सबद्दल बोललो तर त्यांचे जीवन चक्र 35-45 दिवस आहे. त्यामुळे त्यात काही निवडक आजार आहेत. जर लसीकरण केले तर पक्षी पूर्णपणे सुरक्षित राहतात. पक्ष्यांना वाचविण्यासाठी जैवसुरक्षा खूप महत्त्वाची आहे, पण प्रत्येकाला ते शक्य नाही. जैवसुरक्षा शक्य नसेल तर रोगांपासून दूर राहण्यासाठी लस सर्वात महत्त्वाची ठरते. कुक्कुटपालनासाठी जैवसुरक्षा खूप महत्त्वाची आहे. जैवसुरक्षिततेमध्ये अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कुक्कुटपालनामध्ये कोणताही रोग कोणत्याही प्रकारे येऊ नये याची आपल्याला खात्री करावी लागेल. भारतातील हवामान कुक्कुटपालनासाठी चांगले मानले जाते. कारण इथे चारहून अधिक ऋतू आहेत. येथील हिवाळ्यात कोंबडीची वाढ झपाट्याने होते; परंतु वर्षातून दोनदा अशी वेळ येते जेव्हा वाढ मंदावते. एक म्हणजे डिसेंबर-जानेवारी मधला हिवाळा आणि दुसरा कडक उन्हाळा. म्हणजे त्यात किती वाढ होईल हे माहीत नाही. हे टाळण्यासाठी थंडी व उष्णतेपासून पक्ष्यांची बचावाची व्यवस्था करावी लागते.