एकाच दिवशी तीन नाट्यप्रयोग

स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी  अभिनेते  भरत जाधव यांच्या एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार आहेत.

सकाळी ‘अस्तित्व’, दुपारी ‘मोरूची मावशी’ व सायंकाळी ‘पुन्हा सही रे सही’ हे तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत.  ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा हा ४४४४ वा प्रयोग असेल.  या प्रयोगाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

‘अस्तित्व’ या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली आहे. यामध्ये भरत जाधव यांच्याबरोबरच चिन्मयी सुमीत असतील. या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा व्यावसायिक नाटकासाठीचा सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कार व  भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाला. या नाटकाचे ५८ प्रयोग झाले असून ‘मोरूची मावशी’ नाटकाने ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे.

काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याचे  औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी पर्वणी देत आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *