
शेवटपर्यंत दहशतवाद्यांचा पाठलाग केला जाईल. निष्पाप जीवांना न्याय दिला जाईल. भारताने आधीच अनेक कठोर निर्णय घेऊन पाकिस्तानला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मधुबनी येथे एका सभेला संबोधित करताना केले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संताप आहे.
दरम्यान, भारताकडून हल्ला होण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तान सतत आपल्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तो भारताविरुद्ध प्रत्युत्तर देईल. प्रथम पाकिस्तानने शिमला करार रद्द करण्याची धमकी दिली. आता ते धमकी देत आहेत की, जर भारताने हल्ला केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानसमोर कोणतेही आव्हान असेल, तर आमचे सैन्य त्यासाठी तयार आहे.