पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध रणनीती आखत आहे. बुधवारी संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील उपस्थित होते.

मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, दहशतवादाला योग्य उत्तर देणे हा आमचा दृढ राष्ट्रीय संकल्प आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात घ्यायच्या पर्यायांवर लष्करी नेतृत्वाशी चर्चा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, लष्करी दलांना आपल्या प्रत्युत्तराची पद्धत काय असावी, त्यांचे लक्ष्य काय असावे आणि त्याची वेळ काय असावी याबद्दल ऑपरेशनल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

या बैठकीत सर्वांनीच दहशतवादाविरोधात करावयाच्या कृतींबाबत मते नोंदविली.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *