
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषदेचे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम १ ते ४ मे दरम्यान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. येथे भारतासह जगभरातील कलाकार, सर्जनशील सांस्कृतिक प्रतिनिधी सहभागी होतील. ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये शास्त्रीय संगीत, लोकनृत्य, मार्शल आर्ट्स, समकालीन नृत्य-नाटक आणि जागतिक सांस्कृतिक सादरीकरणे यांचा समावेश असेल.
चार दिवसांच्या कार्यक्रमात, प्रसिद्ध संगीतकार एम. एम. कीरवाणी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत की तरंगें’ या संगीत संकलनाचे प्रकाशन केले जाईल, ज्यामध्ये श्रेया घोषाल, शंकर महादेवन सारखे प्रसिद्ध गायक सहभागी होतील. शरद केळकर यांचे ‘संकल्प: एक सत्त्व निष्ठा’ हे सादरीकरण वैदिक परंपरा आणि आधुनिक चित्रपट जगताच्या मिश्रणाचे एक अद्भुत उदाहरण असेल. अनुपम खेर दिग्दर्शित नृत्य-नाटक आणि अंध मुलांचे सादरीकरण भारताची सांस्कृतिक विविधता आणि समावेशकता दर्शवेल. कलारीपयट्टू (केरळ) आणि दांडपट्ट (महाराष्ट्र) सारख्या पारंपारिक युद्धकला दाखविल्या जातील.