पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

राज्यातील पद्म पुरस्कार व पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा अभिनंदन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी राजभवन मुंबई येथे झाला. वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारखे द्रष्टे व प्रगल्भ नेते लाभले. प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी तसेच देशाला ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत पार्श्वगायक पंकज उधास यांना मरणोपरांत पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उन्मेष जोशी यांनी सन्मान स्वीकारला. सुलेखनकार अच्युत पालव व अभिनेते अशोक सराफ तसेच पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती करिना थापा हिला देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पद्मश्री प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार, बासरी वादक रोणू मजुमदार व प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे यांच्यावतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सत्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, आनंद पटवर्धन व अंजली नाईक पिरामल उपस्थित होते.

 

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *