सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण असे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने रुग्णांसाठी फक्त जेनेरिक औषधे लिहून देण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता.
औषध कंपन्यांशी संबंधित एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे. या याचिकेत औषध कंपन्यांवर मनमानी केल्याचा आरोप करण्यात आला होता. अशा परिस्थितीत, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जर हा निर्णय संपूर्ण देशात पाळला गेला तर त्यामुळे महत्त्वपूर्ण सुधारणा होऊ शकतात.सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांना कोणत्याही विशिष्ट कंपनीची औषधे लिहून देऊ नयेत असा सल्ला दिला आहे.