चीनचा पाकिस्तानला पाठिंबा

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची पाकिस्तानविरुद्ध सतत कारवाई सुरू आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूपच वाढलेला आहे.  या परिस्थितीत काही देश भारताला पाठिंबा देत आहेत. तर, चीनने एक मोठे विधान केले आहे.

चीनचे राजदूत जियांग झैदोंग यांनी सोमवारी सांगितले की, दक्षिण आशियात शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी चीन नेहमीच पाकिस्तानला पाठिंबा देईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची भेट घेतली.
सरकारी रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, जियांग यांनी राष्ट्रपती झरदारी यांची भेट घेतली.  पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणावासह विविध मुद्द्यांवर त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली, असे पीटीआयने वृत्तात म्हटले आहे. या बैठकीदरम्यान राष्ट्रपती झरदारी यांनी भारताने अलीकडील पावले उचलल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.  अशा कृती प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी धोका असल्याचे म्हटले होते.
Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *