
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध ‘वर्धनगड’ किल्ला आहे. हा किल्ला महादेव पर्वतरांगेतील ‘भाडले-कुंडला’ या मार्गावर आहे. ‘कोरेगाव’ आणि ‘खटाव’ तालुके जिथे मिळतात तिथे हे ठिकाण आहे.
‘ललगुन’आणि ‘रामेश्वर’च्या जवळच्या टेकड्यांवरून झालेल्या हल्ल्यांमुळे किल्ला धोक्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७३ मध्ये किल्ला बांधण्यास सुरुवात केली आणि १६७४ मध्ये ते पूर्ण झाले.
वर्धनगड किल्ल्याचे एक घर आहे. दरवाज्यातून पुढे गेल्यावर थोड्याच अंतरावर एक छोटेसे, सुस्थितीत असलेले महादेवाचे मंदिर दिसते. देवळाजवळ वटवृक्ष आहे. मंदिराच्या दक्षिणेला दोन तळी आहेत. महादेव मंदिराच्या डाव्या बाजूला ‘वर्धिनी’ देवीचे मंदिर आहे. येथे ‘महिमानगड’ किल्ल्याकडे जाणारा बोगदा असू शकतो. सुमारे २० एकर पसरलेला आणि बाजूंपासून वरपर्यंत उतार असलेला हा किल्ला त्याच्या शिखरावर गोलाकार आहे.

येथील बहुतेक गोष्टी भग्नावस्थेत असून आता फक्त दोन लघु तोफा आहेत. बहुतेक दगडी बांधकाम लहान आहे. किल्ल्याच्या भिंतीचे अनेक भाग कोसळले आहेत. उत्तरेला एक ओसाड तलाव दिसू शकतो. ‘खटाव’ बाजूने किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यातून गडावर चढता येते.दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठी टेकडी दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायऱ्या आहेत. या टेकडीवर चढून जाताना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे. पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. प्रवेशद्वारापासून टेकडीवर असणाऱ्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे पुरतात. टेकडीवर असणारे मंदिर हे गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. त्यामुळे रंगरंगोटी केलेले मंदिर आकर्षक दिसते. मंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभाऱ्यात कासवाची सुंदर मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकडीवरून एक वाट खाली उतरते. या वाटेने खाली उतरताना उजवीकडे पाण्याची टाकी आढळते.