साताऱ्यातील वासोटा किल्ला

वासोटा किल्ल्यास ‘व्याघ्रगड’ असेदेखील म्हणतात. हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवले. हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात आहे. वासोटा किल्ल्याचे श्रेय पन्हाळ्यातील कोल्हापूर शिलाहार प्रमुख भोज यांना दिले जाते. १६ व्या शतकात वासोटा नेहमीच मराठे, शिर्के आणि मोरे यांच्याकडे राहिला.1655 मध्ये जावळी जिंकताना शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात समाविष्ट केला. अवघड नैसर्गिक संरक्षणामुळे महाराजांनी किल्ल्याचे नाव बदलून ‘व्याघ्रगड’ असे ठेवले.

१८१८ मध्ये इंग्रजांनी किल्ल्यावर जोरदार तोफखान्याने बॉम्बफेक करून वासोट्यावरील अनेक इमारती उद्ध्वस्त केल्या. आणि ५ लाखांची मालमत्ता लुटली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचा कैदी ठेवण्यासाठी वापर केला जात असे. वासोटा किल्ला हा गिरीदुर्गा बरोबरच वनदुर्गसुद्धा आहे म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते. वासोटा किल्ला ज्या डोंगरावर आहे, तिथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता. त्याने आपल्या गुरूच्या नावावर ‘वसिष्ठ’ असे नाव ठेवले असेल, अशी आख्यायिका आहे. कालांतराने याचे नाव ‘वासोटा’ असे पडले असावे, असे म्हटले जाते.

शिलाहारकालीन राजाने या डोंगरावर ‘वासोटा’ किल्ला बांधला, असे म्हटले जाते. वासोटा किल्ल्याबरोबर पन्हाळा किल्ला सुद्धा शिलाहारकालीन राजाने बांधला आहे. वासोटा किल्ल्या बांधण्याचे काम शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केले असल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. वासोटा किल्ल्याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईमध्ये सुद्धा नोंद आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *