बालकवींची कविता फुलराणीतून येणार भेटीला

हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती ||
ही कविता सर्वांना आठवत असेल. ही कविता आता चित्रपटात वापरली जाणार आहे.
बालकवींची ही प्रसिद्ध कविता समस्त मराठी जनांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहे.

रसिकांच्या कितीतरी पिढ्या ‘फुलराणी’ने फुलवल्या. आगामी ‘फुलराणी’ या मराठी चित्रपटातून ही अजरामर कविता गीतरूपाने आपल्या भेटीला येणार आहे. गीतकार निलेश मोहरीर यांनी या कवितेला अनोखा संगीतसाज दिला असून गायक हृषिकेश रानडे आणि गायिका वैशाली सामंत यांच्या स्वरांनी हे गीत सजले आहे. गायक आणि गायिकेच्या अशा दोन्ही रूपात हे गीत ऐकता येणार आहे. या कलाकृतीचे लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी, गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर आणि वरुण लिखाते यांचे आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, प्रियंका बर्वे, हृषिकेश रानडे, आनंदी जोशी, शरयू दाते यांचा ‘स्वरसाज’ चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे.

दिग्दर्शक विश्वास जोशी ‘फुलराणी’ हा चित्रपट आपल्यासमोर आणत असून या ‘फुलराणी’ चा अनोखा अंदाज २२ मार्चला आपल्याला चित्रपटगृहात अनुभवायला मिळणार आहे. यातील ‘विक्रम राजाध्यक्ष’ ही भूमिका अभिनेता सुबोध तर कोळी आगरी ठसकेबाज ‘शेवंता’ अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने साकारली आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *